मुख्य सामग्रीवर वगळा

अबब 100 % 🎷

 अबब 💯 % 🎷


सर्वप्रथम दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🏆🎷✈️.


_*वर्तमान काळ आखीव असल्यास, भविष्यकाळ रेखीव बनतो...!*🎷

▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬

   

10 वी च्या परीक्षेत 100 % गुण मिळवणारे ‘हुश्शार विद्यार्थी🎷'

यश छप्पर फाडके .....

काही पालकांना मुलाला केवळ 35 % गुण मिळाले तरीही खूप आनंद🚁 होतो. त्याच आनंदात ते पेढे पण वाटतात.

 तर..... काही पालकांना त्यांचा आनंद गगनात☁️ मावत नाही कारण त्यांच्या मुलांनी बोर्ड परीक्षेत 100 टक्के गुण ✈️ मिळवलेले असतात.

.... चा अर्थ आनंद☺️ हा आपल्या मानण्यावर असतो.

 ▬▬▬۩۞۩▬▬▬

नुकत्याच बोर्ड परीक्षेत भीम पराक्रम केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल आपण बोलत आहोत. हे वाटते तेवढे सहज शक्य झालेले नसते. यामागील सातत्य आपल्याला माहीत नसते.

काही विद्यार्थ्यांच्या मार्क मेमो सोबत अधिक + ..... चे गुणही दिसतात. बऱ्याच जणांना असे वाटेल की या अधिकच्या गुणामुळे यांना शंभर टक्के गुण मिळाले. पण हे अधिकचे गुण मिळवण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतलेले असतात ते पण वाखाणण्याजोगे असते. 

SSC बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा  आणि इतर सह-शैक्षणिक क्रियाकलाप आणि सामाजिक सेवा यांमध्ये सहभाग नोंदवता येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 15 गुणांपर्यंत अतिरिक्त गुण मिळू शकतात. 

पण वाटते तेवढे हे सहज सोपे नाही.... सुरुवातीला ही मुलं गुणांसाठी एखादी क्रिया करत नाहीत. केवळ आवड, छंद म्हणून कला जोपासली जाते. अंदाजे सात वर्ष, आठवड्यातले 4 (किंवा त्यापेक्षा जास्त) दिवस या कलेसाठी दिल्यावर 15 गुण मिळू शकतात.

ही कला/क्रीडा जोपासण्यासाठी दिलेला वेळ, केलेला खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ....... 

हे कला/ क्रीडा अभ्यासून 3 ते 15 गुण + चे गुण सर्वांना दिसतात पण त्यामागचा त्याग, परिश्रम, खर्च, पालकांची उडालेली तारांबळ हे पण विचारात घेतलेच पाहिजे.

पण या कलाक्रेडेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे छंद जोपासला, जातो चालू अभ्यासक्रमात विषय बदल होतो, मन fresh होते. कला / क्रीडा चे सर्टिफिकेट व मेडल्स 🏆,🏅 यांच्याकडे पाहिल्यावर जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करता येत नसतो.

®®®💠®®®


महाराष्ट्रात लातूर पॅटर्न फेमस झाला. आता नांदेड पॅटर्न सुद्धा फेमस होत आहे. लातूर पॅटर्न चा परिणाम असा आहे की या ठिकाणी गुणातून यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

💯 टक्के गुण मिळवण्यात लातूर आघाडीवर आहे. यावर्षीच्या निकालात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 % गुण मिळाले आहेत. 100 % गुण मिळवणारे विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील जास्त आहेत. लातूर विभागात एकूण 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत, त्यामुळे यशाच्या बाबतीत हा जिल्हा अव्वल ठरला आहे.

SSC बोर्ड परीक्षेसाठी राज्यभरातून 9 शिक्षण विभाग पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी विभागातून कोणत्या विभागात किती विद्यार्थी हे पाहू.


  • पुणे: 13
  • नागपूर: 3
  • छत्रपती संभाजीनगर: 40
  • मुंबई: 8
  • कोल्हापूर: 12
  • अमरावती: 11
  • नाशिक: 2
  • लातूर: 113
  •  आणि
  •  कोकण: 9

दहावी हा एक जीवनाला कलाटणी देणारा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा योग्य विचार करून 'स्व' जीवन आनंदी व सुखमय करण्यासाठी नवीन प्रयत्नातून सुरुवात करावी. 
दहावीनंतरच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

 ▬▬▬۩۞۩▬▬▬

टीप:- दहावीचे घवघवीत यश बारावीत जो मिळवतो, तो विद्यार्थी म्हणून टिकला.
कारण दहावीत विद्यार्थी नियमित शाळा (व क्लास) करतात..... 
दहावी नंतर कॉलेज..... क्लास.... मोबाईल🙏.... मित्र🙏..... विश्व व्याप्ती🙏 वाढते यावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे 🙏.



Laziness kills- Ambition

Anger kills - Wisdom

Fear kills - Dreams

Ego kills- Growth

Jealousy kills - Peace

Doubt kills-  Confidence

Now read that right to left🙏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...