मुख्य सामग्रीवर वगळा

महत्व नागपंचमीचे 🎷

 


 महत्व नागपंचमीचे 🎷

ॐ भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि, तन्नो नागः प्रचोदयात्

नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 👏🙏

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात ठेवून आपल्या ऋषीमुनींनी मोठे शहाणपण दाखवले आहे.


कोणत्याही गोष्टीकडे खोलवर/ विचारपूर्वक न पाहिल्यामुळे आपल्याला भारतीय समाजातील रूढी व परंपरा लवकर समजत नाही.भगवान दत्तात्रेयांची अशी शुभ दृष्टी होती, म्हणूनच ते प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकले.भगवान दत्तात्रेयांनी सापाकडून हे शिकले की कोणत्याही तपस्वीने आपले जीवन एकटेच जगावे. एखाद्याने कधीही एका ठिकाणी थांबू नये आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ज्ञानाची देवाणघेवाण करत रहावे.

हिंदू संस्कृतीने प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती यांच्याशी जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 

यातूनच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचे पूजन, पोळ्याला वृषभांचे पूजनकेले जाते.

*अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम्।*

*शङ्ख पालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा॥*

*एतानि नव नामानि नागानां च महात्मनाम्।*

*सायङ्काले पठेन्नित्यं प्रातःकाले विशेषतः।*

*तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्॥*


 * नऊ नाग देवतांचे  नाव 

अनन्त, 

वासुकी, 

शेष, 

पद्मनाभ, 

कम्बल, 

शङ्खपाल, 

धृतराष्ट्र, 

तक्षक आणि 

कालिया. जर सकाळी आपण या आठ नावांचे स्मरण केले तर सकल पापांपासून आपण सुरक्षित राहतो व आपल्या जीवनावर विजय प्राप्त होण्यास मदत होते.


सापांच्या रक्षणासाठी आस्तिक मुनींनी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी यज्ञ थांबवून सापांचे रक्षण केले. यातून तक्षक नागाच्या अस्तित्वामुळे नागांचा वंश वाचला. अग्नीच्या उष्णतेपासून सापाला वाचवण्यासाठी ऋषींनी त्यावर कच्चे दूध ओतले.(नाग, साप दूध पीत नाही हे लक्षात घ्यावे.) तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाऊ लागली. 

भारतात सापांना दैवी म्हणून पूजले जाते. 

हिंदू धर्मात साप मारणे हे पाप मानले जाते आणि असे करणारे लोक दुर्दैवाचे बळी ठरतात. कारण शेतातील साप मेले तर अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदरांची संख्या वाढेल आणि यातून अनर्थ ओढवेल.

हिंदू धर्मीय मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे टाळावे. या दिवशी जमीनही नांगरली जात नाही. या दिवशी तवा अग्नीवर अर्पण करणे अशुभ आहे असे सांगितले जाते.नागपंचमीच्या दिवशी शेतकरी शेतीची कामे करत नाहीत आणि या दिवशी जमिनीत कोणत्याही प्रकारे लोखंडापासून बनवलेली शेतीची अवजारे वापरत नाहीत.

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि साप शेताचे रक्षण करतो, म्हणूनच त्याला क्षेत्रपाल म्हणतात. पिकांचे नुकसान करणारे प्राणी, उंदीर इत्यादींचा नाश करून साप आपली शेतं हिरवीगार ठेवतो. साप आपल्याला अनेक मूक संदेशही देतो.


सापाचे गुण पाहण्यासाठी आपली सकारात्मक आणि शुभ दृष्टी असायला हवी.काही दैवी सापांच्या डोक्यावर अमूल्य रत्न असते. जीवनातील मौल्यवान वस्तू (गोष्टी) आपण ही आपल्या अंतर्मनात जपल्या पाहिजेत. समाजातील मुकुटासारख्या थोर पुरुषांना आपल्या मनात स्थान मिळायला हवे. साप ज्याप्रमाणे डोक्यावर रत्न धारण करतो त्याच पद्धतीने आपणही आपल्या डोक्यात अमूल्य अशा विचारांची साठवण केली पाहिजे. आपल्या जीवनात अध्यात्मिक ज्ञानाचे अनन्य आकर्षण असले पाहिजे जे सर्व ज्ञानांमध्ये रत्न आहे. ते ज्ञान जर आत्मविकासात उपयोगी नसेल तर त्याला ज्ञान कसे म्हणता येईल? ज्या व्यक्तीजवळ विचारांचे धन आहे आपण त्याची पालखी प्रेमाने वाहून नेली पाहिजे. त्याच्या विचारांनुसार आपले जीवन घडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत.

साप बिळामध्ये राहतो आणि बहुतेक वेळ एकट्याने घालवतो. त्यामुळे मुमुक्षूंनी (मोक्षाची तीव्र इच्छा असणाऱ्या व्यक्तीस मुमुक्षु म्हणतात. मुमुक्षु हा संस्कृत शब्द आहे जो मुक्ती मिळविण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि ज्ञान आणि सत्याचा शोध घेतो) सार्वजनिक मेळावे टाळावेत. या संदर्भात सापाचे उदाहरण दिले आहे.

   वासुकी नागाणे, देव आणि दानवांच्या समुद्रमंथनाचे साधन बनून आपली उपयुक्तता सिद्ध केली.

थोडे पुरण पोळी विषयी:

श्रावण मासाला पुरणमास असेही म्हणतात.चणा डाळ ही कोरडे पदार्थ मानली जाते आणि पावसाळ्यात ते खाणे चांगले.

पावसाळा, हिवाळा यांसारख्या ऋतूमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरन्याची शक्यता असते. त्यामुळेच या दिवसात पुरणाची पोळी खाल्ल्याने शरीरात उब निर्माण होते, त्याचा आपल्या शरीराला फायादा होतो. गव्हाच्या पिठातील पुरण पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरणाची पोळी ऍनिमियापासून आपल्याला दूर ठेवते. जे लोकं केवळ तूर, मूग याच डाळी खातात  त्यांच्या पोटात हरभरा जातो. पुरण पोळी योग्य प्रमाणात खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते. पूरनातील गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. 

पुरणपोळी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...